शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू

Thursday, 21st March 2019 05:25:23 AM

मुलचेरा, ता.२१: शेतातील जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोन इसमांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी विवेकानंदपूर येथे उघडकीस आली. रमेश लक्ष्मण आत्राम(३०) व दौलत बच्चा मडावी(४३) दोघेही रा.मुलचेरा अशी मृतांची नावे आहेत. रंगपंचमीच्या दिवशीच ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विवेकानंदपूर येथील नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयातगत गट्टा मार्गावर मक्याची शेती आहे. या शेतात वीजप्रवाह सोडण्यात आला असावा किंवा काल काही ठिकाणी पाऊस व वादळ आल्याने वीज तारा तुटून पडल्या असाव्यात. या तारांना अडकून रमेश व दौलत यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद पाठक घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1RKH5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना