गडचिरोली | --°C | --°C |
कोरची, ता.५: येथील पार्वताबाई विद्यालयात दहाव्या वर्गात शिकणारा वैभव प्रेमदास मेश्राम या विद्यार्थ्याचा आज सर्पदंशाने मृत्यू झाला.
काल(ता.४) पहाटे वैभवला विषारी सापाने दंश केला. त्यानंतर वडिलांनी त्याला गावठी औषध दिले. त्यामुळे वैभवच्या प्रकृतीत सुधारणा वाटू लागली. परंतु काही वेळाने पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्याला गडचिरोलीला हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आज पहाटे वैभवचा मृत्यू झाला.
वैभवचे वडील प्रेमदास मेश्राम हे मूळचे कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील रहिवासी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते १५ वर्षांपूर्वी कोरचीला आले. येथे झोपडी बांधून ते पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होते. मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु काल विषारी सापाने दंश केल्याने मुलगा वैभवचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.