गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.९: तेली समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरुन प्रशासकीय अधिकारी बनून समाजाचा नावलौकिक करावा, असे आवाहन संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी यांनी केले.
संताजी सोशल मंडळातर्फे साई मंदिरात आयोजित संत जगनाडे महाराजांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, मंडळाचे सचिव गोपीनाथ चांदेवार, कार्याध्यक्ष रामराज करकाडे, अॅड.रामदास कुनघाडकर, सुरेश भांडेकर, अनिल बालपांडे, राजेश इटनकर उपस्थित होते. प्रा.कामडी पुढे म्हणाले, तेली समाजात असलेली हुंडा पद्धती बंद झाली पाहिजे. समाजात वर, वधू परिचय मेळावे, तसेच सामूहिक विवाह सोहळे करणे गरजेचे आहे. जाती, पोटजाती असा भेद न करता संताजींच्या झेंड्याखाली एकत्र येऊन समाजाची ताकद वाढवावी, असे आवाहनही प्रा.कामडी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपीनाथ चांदेवार, संचालन रामराज करकाडे, तर अभार प्रदर्शन सुधाकर लाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मारोती दुधबावरे, निवृत्ती शेंडे, सुरेश निंबोरकर, गजानन कुकुडकर, सुरेश भांडेकर, संदीप बाळेकरमकर आदींनी सहकार्य केले.