शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वीज तारांच्या स्पर्शाने धानाच्या गंजीला आग, ६० हजारांचे नुकसान

Wednesday, 10th October 2018 01:34:03 AM

धानोरा, ता.१०: जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने शेतातील धानाची गंजी जळून राख झाली. ही घटना तालुक्यातील इरुपटोला येथे काल(ता.९) दुपारी घडली.

इरुपटोला येथील कालिदास चरणदास चौधरी यांची गावाला लागूनच शेती आहे. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात धानाचे 'लक्ष्मी' या वाणाची पेरणी केली होती. नुकतेच त्यांनी धानाची कापणी करुन आपल्या शेतात ३०० भारे ठेवले होते. त्या शेतावरुनच ११ केव्ही व कृषिपंपाची विद्युत वाहिनी गेली आहे. दोन्ही वाहिन्यांच्या विद्युत तारा लोंबकळत आहेत. अशातच काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास या तारांवर पक्षी बसल्याने दोन्ही बाजूंनी घर्षण होऊन धानाच्या गंजीला आग लागली. या आगीत संपूर्ण भारे जळून राख झाले. यामुळे चौधरी यांचे सुमारे २५ ते ३० क्विंटलचे नुकसान झाले. माहिती मिळताच पंचायत समिती सभापती अजमन रावटे, पंचायत समिती सदस्य विलास गावळे, पंचशिला चौधरी, मुकुंद कावळे, ग्रामसेवक सुदेश टिकले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आपद्ग्रस्त शेतकऱ्यास तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
10QI5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना