शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

क्षुल्लक भांडणातून इसमाचा खून

Friday, 31st August 2018 06:54:14 AM

गडचिरोली, ता.३१: क्षुल्लक कारणावरुन झालेले भांडण विकोपाला गेल्याने एका इसमाने दुसऱ्याचा खून केल्याची घटना काल(ता.३०)रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील मोहगाव येथे घडली. अमरचंद जयराम वंजारी(५५)असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बलराम सिंगार यास अटक केली आहे.

काल रात्री अमरचंद वंजारी हे शेतावर असलेल्या आपल्या सासूला जेवणाचा डबा पोहोचवून परत येत होते. नरसिंग दुधकंवर यांच्या घराजवळ पोहचताच त्यांचे बलराम सिंगार याच्याशी क्षुल्लक कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. यावेळी बलरामने अमरचंदच्या डोक्यावर विटेने प्रहार केला. रक्तबंबाळ अवस्थेत अमरचंद बेशुद्ध पडला. बलरामच्या वडिलाने अमरचंदच्या डोक्याला कापड बांधून अमरचंदच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर अमरचंदला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर अमरचंद पत्नी पुष्‍पाबाई व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरची पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी रात्रीच आरोपीवर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. कोरची पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोरखनाथ दहिफळे घटनेचा तपास करीत आहेत. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X5R44
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना