गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.४: अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ३९ वे अधिवेशन ४ व ५ मार्च रोजी भोईवाडा, परळ मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जत्था पक्षाचे जिल्हा निमंत्रक रामदास जराते यांच्या नेतृत्वात मुंबईसाठी रवाना झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे, कवी अर्जुन डांगळे, बीआरएसपीचे नेते अॅड.सुरेश माने यांच्यासह राज्यभरातील सत्यशोधक व पुरोगामी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, कामगार व कष्टकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार असून, सरकारच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणाबाबत आवाज उठविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा निमंत्रक रामदास जराते यांनी दिली.
श्री.जराते यांच्यासोबत देवसाय आतला, चंद्रकांत भोयर, अशोक किरंगे, भामराज हर्षे, सोमकांत कडुकार, मुखरु दांडवे, प्रकाश सहारे, राजेंद्र धोडरे, संतोष बुरांडे, बारसाय दुग्गा, शोभाताई मेश्राम, पुष्पा कोतवालीवाले, योगीता भोयर, जयश्री वेळदा, सोनिया भगत, सपना पुंगाटी, विजया मेश्राम, पुष्पा चापले इत्यादी कार्यकर्ते रवाना झाले आहेत.