शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पूरपीडित शेतकऱ्याची आत्महत्या

Monday, 15th August 2022 01:43:20 AM

गडचिरोली,ता.१५: यंदा सतत चार वेळा पुरामुळे पिकाचे नुकसान झाल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने काल(ता.१४) संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. बंडू नामदेव चौधरी(४९) रा.मुडझा, ता.गडचिरोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

बंडू चौधरी यांना पत्नी, १ मुलगा, १ विवाहित मुलगी आहे. चौधरी यांना चार एकर शेती आहे. परंतु जुलै व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सतत पूर आल्याने त्यांचे धानपीक चार वेळी पुराच्या पाण्यात बुडाले. यामुळे नुकसान कसे भरुन काढायचे या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. अखेर त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शेतातील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
66R6T
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना