/* */
सोमवार, 5 जून 2023
लक्षवेधी :
  न्यायाधीशांना धमकी देणारे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना अखेर अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             १२ किलो गांजा जप्त, बापलेकांना अटक, मुलचेरा आणि गोंडपिपरी पोलिसांची कारवाई             दहावीच्या निकालात गडचिरोली जिल्हा नागपूर विभागात तिसरा, जिल्ह्याचा निकाल ९२.५२ टक्के, उत्तीर्ण होण्यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक             गाळ उपस्याच्या नावाखाली नदीपात्रातून रेतीचा उपसा, साखरा येथील प्रकार: सरपंचाच्या तक्रारीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष             राज्यातील ७४ नायब तहसीलदारांना पदोन्नती, गडचिरोली जिल्ह्याला मिळाले ७ नवे तहसीलदार           

पूरपीडित शेतकऱ्याची आत्महत्या

Monday, 15th August 2022 01:43:20 AM

गडचिरोली,ता.१५: यंदा सतत चार वेळा पुरामुळे पिकाचे नुकसान झाल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने काल(ता.१४) संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. बंडू नामदेव चौधरी(४९) रा.मुडझा, ता.गडचिरोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

बंडू चौधरी यांना पत्नी, १ मुलगा, १ विवाहित मुलगी आहे. चौधरी यांना चार एकर शेती आहे. परंतु जुलै व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सतत पूर आल्याने त्यांचे धानपीक चार वेळी पुराच्या पाण्यात बुडाले. यामुळे नुकसान कसे भरुन काढायचे या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. अखेर त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शेतातील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IGHG4
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना