गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१४: कालपासून पावसाने उघाड दिला असला तरी गोसेखुर्द धरणासह अन्य धरणांमधून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली-आरमोरी-नागपूर आणि गडचिरोली-चामोर्शी या प्रमुख मार्गांवरील वाहतूक आज संध्याकाळपासून ठप्प झाली आहे.
दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने तब्बल १६ मार्ग बंद होते. मात्र, कालपासून पाऊस थांबल्याने १४ मार्ग सुरु झाले असताना आज गोसेखुर्द धरणातून ८८८४.८७ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गडचिरोलीनजीकच्या पाल नदीला पूर आला. यामुळे गडचिरोली-नागपूर मार्ग बंद झाला. तसेच शिवणी नाल्याला पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.