गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.११: जिल्ह्यात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि संजय सरोवर, गोसेखुर्द, मेडिगड्डा व अन्य धरणांचे पाणी सोडल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून आज चौथ्या दिवशी तब्बल १७ मार्गांवरील वाहतूक बंद आहे. दरम्यान पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील अनेक दुकाने आणि घरे पाण्याखाली सापडली होती. मात्र, पर्लकोटाचा पूर आज दुपारपासून ओसरु लागला आहे. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहू लागल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
पुरामुळे गडचिरोली-आरमोरी आणि गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, आष्टी-आलापल्ली, आष्टी-गोंडपिपरी या प्रमुख मार्गांसह तब्बल १७ अंतर्गत मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.