गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

एकाच कुटुंबातील तिघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Tuesday, 11th February 2020 12:19:38 AM

गडचिरोली, ता.१० : एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना आज (ता. 10) दुपारी गडचिरोली शहरातील सेमाना- नवेगाव परिसरातील आनंदनगर भागातील शेतशिवारात घडली. मृतकामध्ये आई, वडील व मुलाचा समावेश आहे. रवीन्द्र नागोराव वरगंटीवार(५६), वैशाली रवीन्द्र वरगंटीवार( ४७) व साईराम रवीन्द्र वरगंटीवार (१९) अशी मृतांची नावे आहेत. ते आनंदनगर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुलीने घरून पळून जाऊन एका आंतरजातीय युवकाशी विवाह केल्याने मनावर आघात निर्माण होऊन आई; वडील व भावाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घटनेबाबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे गडचिरोली शहरात खळबळ माजली आहे.

दुपारी घटनेची माहिती मिळताच विवाह केलेली वरगंटीवार यांची मुलगी व तिच्या पतीने चामोशीनजीकच्या पोहार नदीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस त्यांच्या मागावर असल्याने त्यांनी दोघांचेही प्राण वाचविले. सध्या दोघांवरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1DONR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना