गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.६: माध्यमांनी पेड न्यूज बाबत सतर्कता बाळगावी तसेच उमेदवार, मतदार व प्रशासनाने जिल्हयातील निवडणुका पारदर्शकपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक प्रवीण गुप्ता यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले
यावेळी निवडणुक निरीक्षक आर. एस. धिल्लन, युरिंदर सिंग, हिंगल जदन, व्ही. आर. के. तेजा , लव कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
c-vigil मोबाईल ॲप, वोटर हेल्पलाइन मोबाईल अॅप, 1950 टोल फ्री क्रमांक यांचा वापर करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी राबवावी, असेही ते म्हणाले.
आचार संहिता भंग, निवडणूक प्रक्रियेबाबत तक्रारी तसेच उमेदवारांकडून होत असलेल्या चुकीच्या पद्धतीबाबत आर.एस.धिल्लन (7588589355) व युरिंदर सिंग (8275136355)(आरमोरी विधानसभा), प्रविण गुप्ता (8275404375) व हिंगलजदन (8275890375)(गडचिरोली विधानसभा) व व्हीआरके तेजा (9405992709) व लव कुमार (9405990195)(अहेरी विधानसभा) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील मतदारांना मतदानाविषयी माहिती असणाऱ्या चिठ्ठ्या ९ ऑक्टोबर पासून वाटप करण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात ९९.४१ टक्के लोकांना मतदान ओळखपत्र दिलेले आहे. मतदानाच्या वेळी ते सोबत आणावे. जर ते नसेल तर आयोगाने ठरवून दिलेल्या इतर अकरा प्रकारच्या ओळखपत्र पैकी एक तरी ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.