गडचिरोली, ता.8 : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणारा मुसळधार पाऊस थांबला असून भामरागड वगळता सर्व प्रमुख रस्त्यावरची वाहतूक सुरु झाली आहे. आजपर्यंत 1687.1 मिलिमीटर इतका पावसाची नोंद झालेली आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात १७ मार्ग बंद झाले होते पैकी काल व आज कमी पावसामुळे त्यातील 16 मार्ग सुरू झाले असून भामरागड- आलापल्ली मार्ग सध्या बंद आहे.
काल अहेरी तालुक्यातील देवालमारी नाल्यातून येताना विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू झाला . दरम्यान आज सकाळी तेलंगणा राज्यातील 4 जण गोदावरी नदीच्या पुरात अडकले होते.त्यांना असरअली पोलिसांनी बोट पाठवून सुरक्षितरित्या बाहेर काढले. पुरात अडकलेल्या 500 मेंढयांना बाहेर काढण्याचेत आले आहे. दरम्यान, काल जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधोक्षक शैलेश बलकवडे यांनी हेलिकॉप्टर ने भामरागड चा दौरा करून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील पाचशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.