गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.४: भरधाव ट्रकने महिंद्रा मॅक्स वाहनाला धडक दिल्याने ८ शाळकरी विद्यार्थ्यांसह ११ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील उमानूर-येर्रागड्डा गावादरम्यान घडली.
उमानूर परिसरातील विद्यार्थी व काही प्रवासी आज महिंद्रा मॅक्स वाहनाने आलापल्लीकडे येत असताना उमानूर-येर्रागड्डा गावादरम्यान समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात ८ शाळकरी विद्यार्थी व काही प्रवासी जखमी झाले. त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.