गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१३: नक्षल कारवायांमुळे मतदान होऊ न शकलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर १५ एप्रिलला मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी व वांगेतुरी या गावांचे पुन्हा मतदान घेण्यात येणार असून, १५ एप्रिलला सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. चारही ठिकाणचे मतदान गट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी नक्षल्यांनी गट्टा गावानजीक भूसुरुंगस्फोट घडविल्याने संबंधित मतदान केंद्रांपर्यंत मतदान पथके पोहचू शकली नव्हती. त्यामुळे चारही ठिकाणी मतदान झाले नव्हते. त्यामुळे आता तेथे १५ तारखेला मतदान होणार आहे.