गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.९: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे उच्चशिक्षित, इंग्रजी, हिंदी, मराठी, गोंडी, माडिया अशा पाच भाषां अवगत असलेल्या व संसदेत आदिवासींसह ओबीसींचे प्रश्न मांडण्यास सक्षम असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले आहे.
भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडून ते सोडविण्यासाठी आतापर्यंत सक्षम पर्याय मिळालेला नव्हता, त्यामुळे रेल्वे, ओबीसी आरक्षण, सिंचन,उद्योगविषयक प्रश्न कायम राहिले आहेत. मात्र डॉ. नामदेव उसेंडी यांच्या रुपाने जिल्ह्याला प्रभावी व सक्षम उमेदवार जनतेला पर्याय म्हणून मिळाला असल्याने मतदारांनी मोठ्या मताधिक्याने डॉ. उसेंडी यांना निवडून देऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला, अशी अपेक्षाही भाई रामदास जराते यांनी व्यक्त केली आहे.