गडचिरोली | --°C | --°C |
अहेरी, ता.१६: नदीतील कच्च्या रपट्याने येत असताना मोटारसायकल खोल पाण्यात कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तालुक्यातील वांगेपल्लीनजीकच्या प्राणहिता नदीत घडली. दिनकर रेड्डी पोरेड्डीवार रा.कागजनगर(तेलंगणा) व बाबूराव यमनूरवार रा.अहेरी अशी मृतांची नावे आहेत.
दोघेही आज कागजनगर येथून मोटारसायकलने प्राणहिता नदीतील कच्च्या रपट्यावरुन अहेरीकडे येत होते. मात्र, अचानक नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल पाण्यात कोसळली. यात दोघांचाही अंत झाला. अहेरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.