गडचिरोली | --°C | --°C |
कोरची, ता.११: रायपूर, राजनांदगाव-वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीतर्फे सुरु असलेल्या ७६५ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या टॉवर उभारणीच्या कामावर असलेले दोन ट्रॅक्टर व तारा ओढणाऱ्या तीन मशिन नक्षल्यांनी जाळल्याची घटना शनिवारी(ता.९)दुपारी ४ वाजताच्या सुमारास मयालघाट परिसरात घडली. नक्षल्यांनी घटनास्थळावरुन सहा वॉकिटॉकीदेखील पळविल्या आहेत.
रायपूर, राजनांदगाव-वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीतर्फे मयालघाट, आंबेखारी, मसेली परिसरात ७६५ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. शनिवारी दुपारी सशस्त्र नक्षलवादी काम सुरु असलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी मजुरांना धमकावून दोन ट्रॅक्टर व तारा ओढणाऱ्या तीन मशिनींना आग लावली. शिवाय सहा वॉकिटॉकीदेखील पळवून नेल्या. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
मागील पंधरा दिवसांत नक्षल्यांनी ८ जणांची हत्या केली असून, १२ वाहने आगीच्या स्वाधीन केली आहेत.