गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.५: जिल्ह्यातील बेरोजगार युवक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवक काँग्रेसने ग्रामपंचायत ,नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हापरिषद क्षेत्रात चलो पंचायत अभियानास प्रारंभ केला आहे.
युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी केतन रेवतकर यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, वैभव भिवापूरे, विधानसभाध्यक्ष अमोल भडांगे, आशिष कन्नमवार, कमलेश खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, महेश जिल्लेवार, अधिर ईंगोले, गौरव अलाम, वैभव कडस्कर, पंकज बारसिंगे, भूषण भैसारे, अभिजित धाईत, विजय वाघुलकर, लोकेश शांतलवार, विवेक घोंगडे, रव ऐनप्रेड्डीवार, सूरज कोडापे, अजित खोब्रागडे व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.