गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.११: राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याचा जल्लोष युवक काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला.
तिन्ही राज्यातील निवडणुकीची अंतिम आकडेवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंकज गुड्डेवार, हसन गिलानी, समशेर खाँ पठाण, अमोल भडांगे, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, रवींद्र शहा, राजू जिवानी, श्रीनिवास दुलमवार, प्रल्हाद कराडे, प्रभाकर तुलावी, मुश्ताक हकीम, नंदू खानदेशकर, उमेश पेटकर, रेमजी भैसारे, वसंत राऊत, दिवाकर मिसार, ढिवरु बारसागडे, भूषण भैसारे, मिलिंद किरंगे, तौफिक शेख, गौरव आलाम, राकेश गणवीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तिन्ही राज्यांतील विजय म्हणजे काँग्रेसला नवसंजीवनी देणारा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला मोठी चपराक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.