गडचिरोली | --°C | --°C |
अहेरी, ता.१९: तालुक्यातील कमलापूर या गजबजलेल्या गावातील मुख्य चौकात नक्षल्यांनी आज मध्यरात्री बॅनर बांधून पत्रके टाकल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
२१ सप्टेंबर २००४ रोजी माओवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे २१ सप्टेंबर हा दिवस १४ वा स्थापना दिवस म्हणून साजरा करावा, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. जनवादी राज सत्ता मजबूर करुन जनयुद्ध तीव्र करावे, असेही नक्षल्यांनी या पत्रकात म्हटले आहे. भाजप आणि संघ परिवाराद्वारे जनतेवर युद्ध लादले जात असून, त्याविरोधात संघर्ष तीव्र करावा, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. पत्रकावर अहेरी एरिया कमिटी(भाकपा माओवादी) असे लिहिले आहे. माहिती मिळताच रेपनपल्ली पोलिसांनी आज सकाळी बॅनर काढून पत्रके ताब्यात घेतली. कमलापूर हे गाव रेपनपल्ली पोलिस ठाण्यापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर आहे, हे येथे उल्लेखनीय.