गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१३: केंद्र व राज्य शासन अनुसूचित जाती, जमाती व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्या लोकांपर्यंत पोहचून भाजप कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांनी केले.
येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई डोळस,,भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष डी के मेश्राम, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटांगले, आरमोरी विधानसभा विस्तारक नेताजी गजभिये, गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्या निताताई साखरे, अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ.गजभिये, महामंत्री तेजस्विनी खोब्रागडे, कुंदाताई मेश्राम, प्राचार्य देवानंद गजभिये, महामंत्री जनार्धन साखरे, हंसराज उराडे, तालुकाध्यक्ष खोब्रागडे उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदूमिलची जागा देणे, लंडनमधील बाबासाहेबांचे घर सरकारने विकत घेणे अशा अनेक महत्वाच्या गोष्टी भाजप सरकारने केल्याचे खा.नेते यांनी सांगितले. भाजप सरकार दलितांसाठी भरीव कार्य करीत असून, हे कार्य दलित समाजापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, तसेच बूथरचना मजबूत करुन आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी यावेळी केले.