बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू

Thursday, 12th July 2018 05:56:47 AM

गडचिरोली, ता.१२: अचानक प्रवाह वाढल्याने दोन नागरिकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या वेगवेगळ्या घटना काल(ता.११)संध्याकाळी अहेरी तालुक्यातील किष्टापूर निलमगुडम येथे घडल्या. नागेश मलय्या कावरे(२२),रा.कोत्तागुडम व मल्लेश पोचालू भोयर(५५)रा.पुसुकपल्ली अशी मृतांची नावे आहेत. 

गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. जिमलगट्टा गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेला किष्टापूर नाल्यालाही पूर आला आहे. अशातच काल नागेश हा आपल्या भावासह शेतावर गेला होता. संध्याकाळी गावाकडे परत जाताना दोघेही नाला पार करीत होते. परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यातून नागेशचा भाऊ कसाबसा बाहेर पडला. मात्र, नागेश पुरात वाहून गेला. 

दुसरी घटना निलमगुडम येथे घडली. मल्लेश भोयर हा काल संध्याकाळी शेतावरुन गावाकडे परत जात असताना वाटेतील निलमगुडम नाला पार करु लागला. मात्र, प्रवाह वाढल्याने मल्लेश पुरात वाहून गेला. दोन्ही घटनांविषयी पोलिस व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांच्याही मृतदेहांचा शोध सुरु आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IV844
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना