गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.५: केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सरकारच्या विरोधात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चकऱ्यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत सरकार गप्प का असा प्रश्न विचारत सरसकट कर्जमाफी द्या, महागाई कमी करा, अशा सरकारविरोधात घोषणा देत एसडीओ कार्यालयाकडे आगेकूच केली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात रायुकाँ जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मनिषा खेवले, फहीम काझी, विजय कावळे, विवेक बाबनवाडे, तुकाराम पुरणवार, विजय धकाते, अजय कुंभारे, कबिर शेख, इस्माईल शेख, बरकत सय्यद, शामीर शेख, गुमानसिंग सुंदरसिंग, विजय चंदूलवार, राजू डांगेवार, ममता चिलबुले, संजय कोचे, दीपाली गिरडकर, मनिषा सजनपवार, यामिनी कुळसंगे, डॉ.कोहाड, संगीता कांबळे, माया खेवले, अनुसया गेडाम, मोरेश्वर भांडेकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.