गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

Friday, 1st December 2017 06:38:58 AM

देसाईगंज, ता.१: शेतात ठेवलेली तणीस काढत असताना विषारी सापाने दंश केल्याने शेतकऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास शिवराजपूर येथे घडली. विश्वनाथ पांडु दुफारे(६५)असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

विश्वनाथ दुफारे हे आज सकाळी तणीस आणण्यासाठी शेतावर गेले होते. परंतु बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतावर जाऊन बघितले असता श्री.दुफारे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस निघत होता. लगेच त्यांना देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YY7MV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना